Marathi Kavita | Prem Kavita | Virah Kavita | Aayushya Kavita | Charoli | Shayari
मराठी कविता | प्रेम कविता | विरह कविता | आयुष्य कविता | चारोळी | शायरी

माझ्या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
मी लिहिलेल्या कवितांचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि हो, आपल्या प्रतिक्रिया / comments नक्की द्या.

Sunday, July 24, 2016

पाऊस म्हणजे...

पाऊस म्हणजे चिंब आठवण,
कोरड्या मनातली ओली साठवण.
मनाच्या कोपऱ्यातलं एक हिरवं पान,
किंवा आत्ताच न्हालेलं हिरवं रान.
ओलाव्याच्या कुशीत हरवलेलं भान,
नव्या तरुणाईचं अन् नव्या नवलाईचं,
मनात विसावलेलं गुपित छान.
जाता जाता तुझ्या-माझ्या,
हुरहुरणार्‍या भेटीचं कारण छान.

No comments:

Post a Comment